स्मरण जेआरडींचे
स्मरण जेआरडींचे, २९ नोव्हेंबर २०१८ २९ नोव्हेंबर १९९३ रोजी जेआरडी गेले, आज त्यांचा २५ वा स्मृतिदिन ! स्वातंत्र्योत्तर भारताच्या सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि पायाभूत सोयी आदी क्षेत्रातील प्रगतीची पायाभरणी जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली झाली तर औद्योगिक भारताची पायाभरणी जहांगीर रतन दादाभाई टाटा (जेआरडी) यांच्या नेतृत्वाखाली झाली. १८६८ सालीच टाटा उद्योगसमूहाची सुरुवात झाली होती. आधी जमशेटजी टाटा आणि नंतर दोराबजी टाटा यांनी १९३२ सालापर्यंत टाटासमूह बऱ्याच अंगानी मोठा केला होता. एम्प्रेस मिल, ताज हॉटेल, टाटा स्टील, टाटा पॉवर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा ऑइल मिल्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, इंडिया सिमेंट, टाटा कन्स्ट्रक्शन, टाटा इलेक्ट्रोकेमिकल्स, टाटा इंडस्ट्रियल बँक आदी संस्था आणि उद्योग १९३२ पर्यंत उभे राहिले होते. १९३२ ते १९३८ या काळात नवरोजजी सकलातवाला टाटा प्रमुख होते. त्यांच्या काळात टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ची सुरुवात झाली. १९३८ साली वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी टाटा समूहाची धुरा जेआरडींच्या हाती आली. पुढची ५३ वर्षे ते समूहाचे अध्यक्ष ह